कापसाचे भाव वाढणार की नाही, कापूस व्यापाऱ्यांनी स्पष्टच सांगितले…
कापसाचे भाव ; मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते. यंदा सुद्धा मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली असता अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. अपेक्षित उत्पादन हाती न आल्याने शेतकरी चांगल्या दराच्या अपेक्षेत आहे. कापूस उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून त्या तुलनेत कापसाचे भाव खूप कमी आहे.
कापूस घरात येवून चार महिने उलटले असून अजूनही कापसाच्या दरात वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. यंदा पर्जन्यमान चांगले असल्याने पिके चांगली होती, परंतु अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झालीय असे असताना कापसाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने कमी दरात कापसाची विक्री करावी लागत आहे.
कापूस बाजारातील व्यापारी सांगतात कि कापसाला सात हजारांहून जास्त बाजारभाव मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. चार वर्षापूर्वी कापूस 12000 हजार विकला होता तशी परिस्थिती सध्या नसल्याने कापूस सरासरी 7000 ते 7500 यादरम्यान राहिल.
कापूस घरात साठवल्याने त्वचेचे आजार वाढले….
कापूस घरात साठवल्याने त्वचेचे आजार वाढत आहे तसेच संपर्कात आल्याने लहान मुलांना खाज येणे यासारख्या समस्या येत आहेत. कापूस घरात असल्याने किडे स्वयंपाकघरात येत आहेत या सर्व समस्येला कंटाळून शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहे.