सोयाबीन हमीभाव ; सोयाबीन उत्पादकांना दिलासा सरकारचा महत्त्वाचा निर्णय…

सोयाबीन हमीभाव ; सोयाबीन उत्पादकांना दिलासा सरकारचा महत्त्वाचा निर्णय…

सोयाबीन हमीभाव ; सोयाबीनला बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने केंद्र सरकारने यंदा हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या महाराष्ट्रातून 14 लाख 13 हजार टन सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. सोयाबीन खरेदीमध्ये सुरुवातीला ओलाव्याच्या अडचणीमुळे खरेदी काही दिवस खोळंबली होती त्यामुळे शेतकऱ्यांना आपले सोयाबीन वेळेवर विकता आले नाही. नंतर बारादाना संपल्यामुळे अनेक दिवसांपासून सोयाबीन खरेदी बंद आहे.

 

सरकारने हमीभाव खरेदीसाठी 13/जानेवारी हि शेवटची तारीख निश्चित केली होती परंतु बारदाना आणि ओलाव्याच्या अडचणीमुळे सरकारने यामध्ये मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांना आता 31/जानेवारी/2025 पर्यंत सोयाबीनची विक्री करता येणार आहे. आपल्या महाराष्ट्रातील सोयाबीनची उत्पादकता पाहता 1000 पेक्षा जास्त खरेदी केंद्राची परवानगी आवश्यक होती. नाफेड आणि NCCF वरील केंद्रावर 5/लाख 24/हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. (Government scheme maharashtra 2025)

 

31/जानेवारी/2025 पर्यंत सोयाबीन खरेदी सुरू राहणार आहे. हि माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सांगितले की सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना केली होती ती मागणी त्यांनी मंजूर करीत 31/जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

 

Leave a Comment