Crop insurance ; पिकविमा भरलाय पण हे दोन कामे केल्याशिवाय पिक विमा मिळणार नाही…
Crop insurance ; राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयाची पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे असुन रब्बी हंगाम 2024-25 मध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पिक विमा भरलाय. पिकविमा मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी सरकार आणि विमा कंपनीने निश्चित केल्या आहेत ज्याशिवाय शेतकरी पीक विम्यासाठी पात्र होत नाही.
पीक विमा मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या आवश्यकता पूर्ण करण्याचे आवाहन सरकारने शेतकऱ्यांना केले आहे. कोणत्या अटी पूर्ण केल्याशिवाय शेतकरी पीक विमा लाभांसाठी पात्र होत नाही हे जाणून घ्या..
1) ई-पिक (ई-पिक पाहणी) सर्वेक्षण करा…
सरकारी नियमांनुसार, शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. पिकांची नोंदणी या ई-पिक पहाणी ॲप्लिकेशन द्वारे पूर्ण करावी. जर तुम्ही ई-पिक पाहणी केली नाही, तर तुमची जमीन पडीक धरली जाईल आणि तुम्ही पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळविण्यास अपात्र व्हाल. तथापि, जर तुम्ही अजूनही तुमची ई-पीक पाहणी करणे बाकी असेल तर शक्य तितक्या लवकर पूर्ण करा…
2) जर पिकाचे नुकसान झाले असेल, तर 72 तासांच्या आत दावा दाखल करा..
शेतकरी मित्रांनो, कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या पिकाचे झालेले नुकसान 72 तासांच्या आत विमा कंपनीला कळवणे बंधनकारक आहे. जेव्हा अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, सततचा पाऊस पडतो, तेव्हा 72 तासांच्या आत विमा कंपनीला नुकसानीची माहिती देणे बंधनकारक आहे. पिकाच्या नुकसानाची माहिती देण्यासाठी पीक विमा अर्जाचा वापर करा.
शेतकरी मित्रांनो, विमा भरल्यानंतर, शेतकऱ्यांना वाटते की कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तर त्यांना पीक विमा मिळेल, परंतु विमा कंपनीच्या नियमांनुसार, शेतकऱ्यांना वरील दोन गोष्टी करणे आवश्यक आहे.