Crop insurance 2025 ; एक रूपयात पिकविमा योजना बंद होणार? कृषीमंत्री माणिकराव कोकाटे
Crop insurance 2025 ; राज्य सरकारने पिकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा यासाठी एक रूपयात पिकविमा योजना सुरू केली आहे. एक रूपयात पिकविमा योजनेला संपूर्ण राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि या योजनेत संपूर्ण शेतकरी सहभागी झाले. परंतु एक रूपयात पिकविमा योजनेत बोगस अर्ज आणि गैरव्यवहार वाढले आहेत. (Pikvima yojna)
पिकविमा योजनेतील गैरव्यवहार थांबवण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने एक रूपयात पिकविमा योजना बंद करण्याची शिफारस सरकारला केली आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कोणता निर्णय घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. एक रूपयात पिकविमा योजनेत गैरव्यवहार वाढल्याने ओडिशा सरकारने हि योजना बंद केली होती. (Insurance scheme)
एक पिकविमा अर्ज भरण्यासाठी फक्त एक रूपया खर्च असल्याने सिएससी चालक शेतकऱ्यांना न कळवता परस्पर पिकविमा अर्ज भरु लागले आहेत. योजनेतील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी एका अर्जासाठी किमान 100 रूपये भरावेत असे या समितीने सुचविले आहे. यंदा खरिप 2024 मध्ये चार लाखांपेक्षा अधिक बोगस अर्ज भरण्याचे समसमान आले आहे. (Crop insurance scheme 2025)
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणतात…
एक रूपयात पिकविमा योजना बंद होणार या चर्चेवर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की केंद्र सरकारकडून सर्व समावेशक पीकविमा योजना राबवली जाते. या योजनेत एक रुपया भरून पंतप्रधान पिकविमा योजनेत सहभागी होता येते. एक रूपयात पिकविमा योजना राबवल्याने पिकविमा योजनेत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा सहभाग वाढला होता. परंतु बीडमध्ये बोगस पिकविमा प्रकरणे आढळून आल्यामुळे या योजना बंद करण्याची मागणी केली जात आहे. यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की योजनेविषयी जो काही निर्णय आहे तो कॅबिनेटमध्येच घेतला जाईल.