Nuksaan bharpaai ; या जिल्ह्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर

Nuksaan bharpaai ; या जिल्ह्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर ….

Nuksaan bharpaai ; शेतकऱ्यांना सरकारकडून अतिवृष्टी, पुर परीस्थिती, दुष्काळ, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीने शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामात उपयोगी पडावे यासाठी निविष्ठा अनुदान दिले जाते. एका हंगामात एका वेळी या निविष्ठा अनुदानाचे राज्य आपत्ती प्रतीसाद निधीतून वाटप केले जाते. निविष्ठा अनुदान आता शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत दिले जाते. (Government scheme 2025)

जुलै, ऑगस्ट 2024 मध्ये ढगाळ वातावरण तसेच सततच्या पावसामुळे वर्धा, अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील संत्रा वर्गीय पिकात मोठी फळगळ झाली होती. या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्त यांनी निधीची मागणी केली होती. याबाबत 15/डिसेंबर/2024 रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला होता. (Nuksaan bharpaai 2025)

दि. 21/जानेवारी/2025 रोजी फळ पिकाच्या झालेल्या नुकसानी करीता 16583.08 लक्ष एवढा निधी मंजूर केला आहे. यामध्ये वर्धा जिल्ह्यासाठी 1084.98 लक्ष रुपये, अकोला जिल्ह्यासाठी 1090.62 लक्ष तसेच बुलढाणा जिल्ह्यासाठी 945.65 लक्ष आणि अमरावती जिल्ह्यासाठी 13461.83 लक्ष एवढा निधी मंजूर केला आहे. (शासन निर्णय GR येथे पहा)

 

Nuksaan bharpaai

Leave a Comment